Tuesday, November 25, 2014

नवनाट्याच्या नावानं SSS


 

“साला, मुंबई आपली ! आणि धंद्याला लावली यांनी ! तुम्ही साले बघत राहिलात ! मराठी बुद्धिजीवी, साले !”,  प्राध्यापक नेसवणकर  राजस्थानी वडापाव खाताना माझ्यावर गुरकावले. इतक्या जोरात, की उंदरासारखी घरी पळत निघलेली पब्लिक पण राड्याच्या आशेने स्लो मोशन झाली. जीपीओ समोरच्या स्टेशनरी गल्लीत संध्याकाळी सातला नेसवणकर माझी शाळा घेत होते. हे बोलताना त्यांनी अख्खा वडापाव , पॉइंटर सारखा माझ्यावर रोखला होता. पब्लिकच्या नजरेतून गुन्हेगार हटावा म्हणून मी पॉइंटरच्या रेषेतून बाजूला होऊन मागे पाहू लागलो. ही माझी नेहमीची ट्रिक आहे. त्यामुळे पब्लिक पण पॉइंटरच्या दिशेने महाराज आणि स्टेशनरीच्या दुकानात मांड टाकून बसलेल्या जिग्नेसभायकडे बघू लागली.  जिग्नेसभाय, पब्लिकच्या गळ्यात उल्हासनगर स्टेशनरीच्या पुड्या बांधण्यात मगन हता. रेंजमध्ये जिग्नेसभाय आल्याने नेसवणकर एक्स्प्लोड झाले.


“तो कच्छी, हा मारवाडी ! साली मेहनत पण तुमच्या राज्यात उपर्‍या नायतर घाट्यानेच करावी ! तुम्ही साले फक्त पाट्या टाका मंडे टू मंडे ! युसलेस लोक !” नेसवणकरांचे तोहा मराठी  बरवा.

 

नेसवणकर दादरच्या एका सांस्कृतिक मिसाल कॉलेजमध्ये मंडे टू मंडे इकोपाटी टाकतात.  हे बोलून पब्लिकचा आणखी टाइमपास करता आला असता, पण मला राजस्थानी वडापाव  आवडतो. बाजूलाच आमचा तिसरा मित्र डॉक्टर , हा वडापावच्या आत आपली हायजिनिक नजर घालून तो फस्त करत होता.

 

नेसवणकरांचा हा जो प्रांतवाद उफाळून आला होता तो अचानक नव्हे. फोर्टात तशा मराठी माणसाच्या सीमा-पताका दाखवण्यासारख्या नव्हत्याच. पण नव-नाट्याभिमानी नेसवणकरांचा नम्रपणा नाहीसा होण्यामागे माझाच कावा होता. एकतर माझे आणि नवनाट्याचे बरें नसताना आणि मी कोहिनूरला गहरीचाल बघायची ऑफर दिली असताना – दोस्तीखात्यात आणि फुकट, नाटक दाखवण्याची स्टेक लावून, यांनी मला फोर-एटमध्ये उतरवले होते. वारीला निघलेले भक्त जसे गावाच्या मंदिरात फेर धरून मग निघतात, तसे छबिलदास गल्लीत भेटून, उकाळा चहा हे नाटक्यांचे अमृत मारून आम्ही चर्चगेटकडे निघालो.

 

“आज व्यावसायिक रंगभूमीवर काही घडतच नाही. जे घडते ते इथेच.”,  पोहोचताच मला डॉक्टरने सुवार्ता दिली.

“हा एक मोठा ठेवा आहे आपला.” नेसवणकर एनसीपीएच्या भव्यतेने दीपले की काय ?

“थिएटर टाटाचे , डायरेक्टर हिन्दी आणि मुंबई मराठी माणसाची ?” आपली चकमक.

“कद्रू , जातीयवादी साला !”

“थिएटरची भाषा फक्त रंगभाषा. तिथे जगाची बोली एक होते.” सर.

“मग गुजराती थिएटर-“

“गुजराती थिएटर !!” सर किंचाळले, पब्लिकला त्यांच्या एलिटनेस विषयी डाउट येऊ नये म्हणून पुढे कुजबुजले.

“ते सोडून बाकीच्यांचे बोलतोय आम्ही.”

दोघांनीही प्रचंड धंदो करणार्‍या थिएटरला आपल्यातून वगळले. ही या दोघांची पुर्वीपासून पद्धत आहे. लोक येतात,  व्यवसाय होतो, तो आपला नाही. भिकेचे डोहाळे ! यांची चळवळ अशाने यथावकाश संपेल असे मला वाटले.

“नाटके काय पृथ्वीलाही होतात !” डॉक्टर

पृथ्वी नावाचे एक भले थोरले ग्लोब थिएटर , त्यावर जीवन नावाचे महानाट्य दिसू लागून मी गलबललो.

“छबिलदास आणि पृथ्वीने चळवळीला आधार दिला. आज पृथ्वीला नाटके होतात आणि चांगली होतात.”

“तिथे आपला एक माणूस , तो पण बालनाट्यात. पण मॅक असतो ना तिथे?” मी व्हेग.

“तुला आपले- परके करायची भारी सवय !”  

छबिलदास आणि शिवाजी या अडीचशे फुटाच्या अंतरात प्रचंड अपने-पराये करणार्‍या दोघांनी मला सुनावले.

“आता बघ , कोण –कोण येऊन पाहतात आपले नाटक.” सरांचा अभिमान.

मी पाहिले तर काही परप्रांतीय, एक सरदारजी सपत्नीक आणि एलिट मराठी असा ई-सेन्स पसरला होता. बोलण्यात मराठी, हिन्दी, हिंग्लिश सारे होते.

“क्वालिटी बिगिन्स फ्रॉम माउथ अँड एण्ड्स देअर.”

माझ्याकडे डायरी नव्हती- नाहीतर असली वाक्ये सुचली की मी ती लिहून काढतो.

 

“आता आपण जे नाटक पाहतोय ते वेगळे आहे. तुला समजत नाही, मग शिव्या देतोस- म्हणून आधी सांगतो.”

डॉक्टरने माझ्यावर ट्रीटमेण्ट सुरू केली.

“समजत नाही अशी नाटके मुळात करावीच का ? मग लोकांना फुकट पास वाटून बोलवावे लागते.”

“नशीब समज तुला बोलावतात !” डॉक्टरने माझी काढली.

“उद्या आठवणी काढतील हे लोक. मी येऊन गेलो होतो म्हणून !” मी.

“सेटवर काही चोरी झाली तर नक्कीच काढतील !”

सरांनी मला कॉग्निझिबल केले.

“मला नाही वाटत, इथे चोरण्यासारखे काही असेल. अगदी संहिता ही नाही.”

“तुझ्या कामाची नाहीच ती !”

“का ?”

“ ऐक, या नाटकाला शेवट नाही.”

“का ? लेखकाला पैसे मिळाले नाहीत, म्हणून त्याने शेवट लिहिलाच नाही का ?”

“तुला थोडीफार अक्कल असेल , हे गृहीत धरून तो तुझ्यावर सोडलाय.”  सरांचा मी बॅकबेंचर. 

“ तुम्ही लोक प्रेक्षकाला फार गृहीत धरता.” मी यांची नेहमीची बाजी यांच्यावरच उलटवली.

“त्याला किमान अक्कल असावी, अशी इथे अपेक्षा आहे.” सर.

“लोक शेवटपर्यंत थांबत नाहीत. म्हणून मी शेवटापासून सुरू करून  सुरवातीला संपेल, असे नाटक योजतोय.”

“डॉक्टर ,  मी शेवट बघून घरी जाणार ! शेवट पाहिला की उरलंच काय ? वडे ?

“नाही ! ही चळवळ तुला कळणार नाही. ब्रेख्त कशाशी खातात माहीत आहे ?”

“मला  ब्रेड कशाशी खातात माहीत आहे. आमलेट शक्यतो.” मेरी पसंद

“ ब्रेख्तियन नाटक दोन समांतर ध्रुवांवर चालते. एक घटना आणि दोन त्या घटनेचे  विश्लेषण.”

“म्हणजे टोस्ट ब्रेड आणि आत आम्लेट, तसे ना ?”

“गळा दाब त्याचा ! दाब !”

सरांना हिंसक करणे मला वारंवार आणि सहज जमते.

“गळा दाबलात, तर ही घटना माझ्या बाबतीत, घडेल ना ? मग तिचं विश्लेषण मी कसा करू शकेन ?”

माझी रास्त शंका.

“इतका सहज मारून उपयोग नाही याला !”

“मग नाटके दाखवून-दाखवून मारा !”

“त्यापेक्षा ऐकवून मारतो....  तर जसे इंप्रेशनिस्ट आर्टमध्ये एकातून एक निघणारी अनेक इंप्रेशन्स, एका प्रतलावर- एकाचवेळी मांडली  जातात तसा.. इथे विश्लेषणांचा कोलाज मांडलेला आहे.”

“त्या ऐवजी नाटककाराला प्रेक्षकां समोर उभे केले तरी कोलाज म्हणजे काय, हे लगेच कळेल !” मी.

“त्याच्यापर्यन्त पोहोचायला तुला आयुष्य घालवावं लागेल.” डॉक्टर

“नो युज ! याच्या डोक्यातच कोलाज भरलेला आहे.” सर हतबल.

“ मी ट्राय करतो... हे बघ, ही विश्लेषणे समजून, त्यातून अर्थांचा जो विरोध हे नाटक मांडते- त्यामुळे आपण तीन काळात हे नाटक पाहू शकतो.”

“ मी आज पाहणार. मला उद्या वेळ नाही.” माझी तक्रार

“पहा आजच, पण काल-आज आणि उद्या समजून घे !”

“काल मी बरा होतो. आजचं काही खरं नाही. उद्या बघत नाही मी बहुतेक !”  

“साल्या , हे लोक आलेत त्यांचा तरी मान राख ! काय बरळतोयस ?”

 

सारे आमच्या सारखे बोलावलेले फुकटे. पण हे फुकटे पोषमदी’ , इंग्लिश फाडत -  यातील एक मला  स्टान्स्लोव्हस्की सारखा दिसला. मी डॉक्टरला तसे विचारले. त्याने ते हिंदीतले विख्यात दिग्दर्शक असल्याचे सांगितले. त्याना एलिट ब्युटीजचा घेराव होता. त्यात नाट्यविषयक जाणिवेपेक्षा देवदर्शनचं जास्त दिसलं. एक समीक्षक होते.

“हे इथे कशाला ?”

“त्यांना नाटकाची नाळ कळते.” डॉक्टरची एनाटोमी. 

“पण आमची नाटकं बघताना त्यांची नाल जाते !” मी

“टीका करायची तर आधी नाटक कळावं लागतं.” सरांचा टोला.

“अच्छा अच्छा !  म्हणून हे विख्यात दिग्दर्शक आपले नाटक स्वत:लाही कळू नये असे ठेवतात. म्हणजे समीक्षकाने टीका केली तर त्याचेचं  अज्ञान प्रकट होईल !”

 या लोकांची युक्ति मला हळूहळू लक्षात आली होती. मध्येच दोघेजण जीन, खादी झब्बा, शबनम असे दिसले.

“ हे आऊट डेटेड आहे ! हे चालणार नाही ! यांना बाहेर काढा !”  मी.

“ते नाट्यविभाग औरंगाबादचे स्नातक आहेत.” सर अ‍ॅकॅडमिक.

“ते मला माहीत नाही- पण अमेरिकेत मिलरचा काळ सरून आल्बीचा सुरू झालाय याचं काही नाही यांना ? त्या प्रमाणे वेश बदलायला नको ?”  मी गनपावडर पेरली.

“पंथ काय वेशावरून ठरतात का रे ?” डॉक्टर स्वत: नेहमी ट्रेण्ड  सेटपमध्येच असतो.

“मला वाटले खादी, निळी जीन्स आणि शबनम हा छबिलदासचा युनिफॉर्म आहे !” मी ही SSS मारली,  

“आणि श्रीकृष्णचे वडे , हे त्यांचे दोन वेळचे अन्न आहे !”

“तुझा खून होणार. तो पण छबिलदासच्या गल्लीत !”   सर एकाचवेळी ज्योतीर्भास्कर आणि रामनराघव. 

“मला मारून सत्य बदलणार नाही. सत्य हे आहे, की छबिलदास चळवळीतून फक्त एकच माणूस भरभराटीला आला.”

“कोण !?” दोघांचा एकाचवेळी आणि अविश्वासाचा सूर.

“ मंजू.”

“कोण मंजू ?”

“ कोण काय ? वडावाला. त्याच्या टपरीचा फूल ग्राऊंड फ्लोर झाला. चळवळ संपली तरी वडे चालूच आहेत.

बंडे शमली झेंडे राहिले.” आज जिभेवर सरस्वती स्केटींग करत होती.

“मुस्काट दाबून कानफट फोडेन !”  सर.  त्यांना वारंवार हिंसक करणे मला बर्‍यापैकी जमते.

इतक्यात लोक आत जाऊ लागले. आम्ही ही निघालो. गालीचात पाय दुखू लागले, आम्हाला लाकडी जीनेच बरें. आत पब्लिक तुरळक. सारे इतरांना अछूत मानणारे. लांब-लांब जाऊन बसले. आम्हाला चर्चा करत पहायचे असल्याने आम्ही ही उलटे, मागे जाऊन बसलो.  

 

“यात जी ही मुलगी काम करतेय ती एके दिवशी फार मोठी बनेल.”

डॉक्टर   रोगाच्या डायग्नोसिस सारखा मोघम बोलतो. फ्लू की कावीळ ताकासतूर लागू देत नाही. मोठी काय बनेल हे गुलदस्त्यात ठेवतो. म्हणजे उद्या  बाई दीडशे पौंडाची झाली तरी मोठी. श्रीमंत नवरा गाठला तरी मोठी. पण इथे त्याचे शब्द खरे ठरले, बाई पुढे मोठी लेखिका झाली....

 

... आधी अंधार, त्यात आवाज फक्त खोकल्याचे. आता कुजबुजत बोलण्याशिवाय पर्याय नव्हता.

“ स्टेज ब्लॅंक ठेवायचं नसतं. प्रकाश, संगीत – काहीतरी इंद्रियांना जाणवेल असे घडले पाहिजे.” मी बेसिक.

“इंद्रियांना !! भिकारचोट !!! ते इंद्रिय वगैरे तुमच्या नाटकात !” सर.

“इथे सगळ्या नियमाना चॅलेंज करतो आम्ही. याला प्रेग्नंट पॉज म्हणतात. तो असा अंगावर येतो. पोकळीत नेतो आपल्याला.” डॉक्टरने नाटक पार ऑपरेशन थिएटरमध्ये नेले.

काही वेळाने एक अंधुक दिवा आला , एक जण-  आंधळा असावा- त्या अंधुक उजेडात चाचपडत आला. त्याने गॉगल लावला होता.

“आंधळ्यांचे नाटक बघायला मला का आणलं ? आधी वाद्यवृंद असायचे, हल्ली नाटकं पण असतात?

“चक्षु आपले असले तरी दृष्यावलोकन आपण उधार घेतले असते. समजून घे.”

“डॉक्टर , मला तुझा रेबॅन उधार देतोस ? माझा जीव आलाय त्यावर. वेळ बघून मारणार होतो मी- पण तू कधी तो साइडला ठेवलाच नाहीस.” मला डॉक्टरचा दीर्घ उसासा ऐकू आला.

“ तू नाटकासाठी प्लॉट चोर, गॉगल कशाला. तू मद्रासी हीरो वाटशील रेबॅन लावून, फारतर.”

“पण त्यांना खूप पैसे मिळतात, सर. त्यांच्या एका दिवसाच्या मानधनात तुमची चळवळ वर्षभर चालेल.”

“ बाहेर गेलो की याला तुडवू !”  (अशी कुजबूज मला ऐकू आली) पण तो भास असावा. माझे मित्र ब्रूटस नसावेत.

“ तू इथे मराठीत कामाचा नाहीस- तू साऊथलाच जा.” नेसवणकर मला तडीपार करू पाहत होते.

“सर, मी खाली मैसूरपर्यंत गेलोय नाटके करत. त्याखाली अजून योग आलेला नाही.”

 

माझी आता नाटकाशी नाळ तुटली. मी नंतर सारा वेळ प्रेक्षकांकडे पाहत होतो. माझा नाद सोडून डॉक्टर आणि सर गहन चर्चेत नाटक पाहत होते. स्टेजवरचे आंधळे आता कागदाची होडी करून जमिनीवर चालवत होते !   

“ हे पाहायला मला थेट बोरिवलीहून यायला लावलं तुम्ही ? बदला घेईन मी याचा !  कोहिनूरला गहरीचाल रीपीट रनला आहे. उद्या तीन तिकीटं काढून तुमची ठासतो की नाही बघा.” माझी ढुस.

“ सहा काढ – तीन आपल्याला – तीन आपली डोकी काढून ठेवायला!”

 

मी आजूबाजूला पाहिले- बहुतेक खुर्च्या रिकाम्या होत्या. प्रेक्षकांच्या संख्येने भागले तर प्रत्येक प्रेक्षक आणि खुर्च्या यांचे गुणोत्तर रावणाशी मॅच होत होते.

“इथे खूप आहेत. पण डोके कुणाचेच ठेवले नाहीये.  याचा अर्थ या लोकांना डोके नाही, असा थेट होतो.” काडी.

“ते विसरले असतील. कोहिनूरला !”

एनसीपीए आणि कोहिनूरचे हे असे कनेक्शन आहे. दोन्हीकडे डोक्याचाच प्रॉब्लेम.

 

अचानक समोर जे काही सुरू होते ते थांबले. असे मध्येच का थांबले, मला कळेना.

“उठ ! संपलं नाटक.”

“असं कसं संपलं ? हा अन्याय आहे ? अर्धंच दाखवलं मला.”

 मी जोरात बोलल्याने सगळे मागे पाहू लागले. त्यामुळे दोघे  ओशाळून मागे-पुढे पाहू लागले.

“चल, भेटून जाऊ. "
आम्ही स्टेजवर. तिथे सारे एलिट , काय ग्रेट अनुभव होता, थाटाने कौतुक करत होते.

“ हे लोक यांची मारताहेत... यामुळे  हे पुन्हा असलेच नाटक करतील.” माझी भीती.

“लक्ष देऊ नको- हा गुडघीरोग आहे.” सर डॉक्टरला.  

 

सारे स्पेसिफिकली नटीकडे तिची तारीफ करायला जमले. तिने नेमकं काय केलं ते तिला आणि मला माहीत नव्हतं, पण लोकांना ती आवडली होती हे नक्की.

“तुझ्या खीशात पेपर कटर आहे का ?”

 मी डॉक्टरला धंद्यातला प्रश्न केला.

“का ? उपटायचेत ?”

“नाही- अंधारात हिला टेकवतो- विचारतो- क्युं रे , अभिनय करेगी ? बोल ! आणि अभि नय करेगी- कब्बी नय करेगी- असे वदवून घेतो तिच्याकडून”

“ तो बघ तुझा मित्र आहे तिथे- भेट त्याला.”

दोघांनी मला कलटी केले. मी नट मित्राकडे- तो अजूनही नाटक न संपल्यागत कंफ्यूज होता. बाजूलाच एक त्याच्याहून कंफ्यूज माणूस उभा होता. हा नाटककार असणार. मी हात मिळवला.

“चांगलं लिहिलंय तुम्ही.”

नेम सही लागला !

“चांगलं !?? मी लिहिलंय हे ?? मी लिहिलंय ??”

“तू जर तुझी कलाकृती डिसओन करत असशील तर हरकत नाही. पण तूच तो !”

त्याने आपले केस भसाभासा विस्कटवले आणि तिथून देवदास बनून,  खांदे पाडून  जाऊ लागला.

“हा प्रकार युरोप, अमेरिकेत सुरू झाला, तेव्हाच त्याच्यावर बॅन का नाही आणला ?” मी.

“तो इथे आणून तुला दाखवायचा होता म्हणून.”

असे म्हणून मित्र आलेल्या साहित्यिक कंपूशी बोलू लागल्याने मी एकटा पडलो. तिथून मी दोघांना खुणा करत होतो- त्यांनी नटीला घेरले होते. नटीच्या सौंदर्याने त्यांना घेरले होते. माझा तिथेच हुतात्मा चौक. दर्शनाने तृप्त होत्साते दोघेही आले, आम्ही पायी व्हीटीला निघालो. सरांना सोडून आम्ही दादरला चेंज करणार होतो. वाटेत सर, ज्ञानाचे, निरीक्षणाचे आणि विश्लेषणाचे मुख्य साधन चक्षू आहेत असे मला वारंवार बजावत होते. मी संध्याकाळच्या फोर्टात ते काम इमाने इतबारे करत होतो. सारे शांत होत होते. आता काय करावे?

“या नाटकामुळे फक्त एनसीपीए चे नाव होतेय. तुम्ही चळवळवाले फक्त पालखीचे भोई ठरताय !”  

राडा !!

“सुमार माणसा, अशा प्रयोगांनी मेंदूला खुराक मिळून बुद्धीची भूक भागते, तुला नाही कळणार !”

“तुझा अजून सांस्कृतिक जन्मच झालेला नाही.”

 

माझा सांस्कृतिक जन्म झालेलाच नाही- या निष्कर्षापर्यंत दोघेही आले.

 

“मला भूक लागलीय... राजस्थानी वडापाव !

 मी पोटार्थी किडा झालो- दोघांना फरफटत गल्लीत नेले ...

 

... वडापाव खाताना सरांच्या पॉइंटरमध्ये महाराज आणि जिग्नेसभाय एकाचवेळी आले....

कच्छीला शिव्या, राजस्थानी वडा आणि तंबीची कटींग मारून आमची मराठी अस्मिता शांत झाली.

 

  • आभास आनंद 

बोले तैसा चाले ...

     सकाळी सात अट्ठेचाळीस ला  भाऊ ताजा होता पेटलेला होता,
अरे, एवढी जर  लाज असेल ना आपल्या मराठीपणाची, तर वाढवा दाढ्या आणि….
पुढले वाक्य भाऊ स्पेशल आहे. भाऊ पेटला का असाच बोलतो भाऊची बखर छापायची ठरवून सेन्सॉरबोर्डात टाकली तर एकही वाक्य पूर्ण छापता येणार नाही.  पुन्हा बखरया शब्दावरसुध्दा भाऊचा आक्षेप असेलच! ख्खी सात अट्ठेचाळीस  भाऊची नजाकत आणि अदा,  अदब से पाहत होती. अख्खं कम्पार्टमेंट बोरीवली  ते दादर रोज  (रविवार सोडून) असंच असतं.

अरे पण  हिंदी पिक्चर पहायला आवडतात म्हणून काही लगेच आमच्यावर शस्त्रक्रिया करायची गरज नाही.
णखी एक चावी! भाऊने ढापण्या फडफडवल्या
अरे पण हा साला नाना, मराठी  चित्रपट डफ्फर असतात म्हणतो! म्हणा! तुम्हाला सगळे खान लोक ....  पुन्हा तेच!

     काय झालं होतं, सकाळी  सात अट्ठेचाळीसने बोरीवली सोडता-सोडता कुणीतरी मराठी चित्रपटांची करुन टाकली होती. भाऊची अस्मिता वगैरे दुखावली गेली होती  आणि मायमराठीतून अस्खलित पट्टा सुरु झाला होता
अरे आपल्या अरुणने श्वासकाढला! श्यामची आई नंतर पहिल्यांदा सुवर्णकमळ ! आता ऑस्करला चालला अरुण, आणि तुम्ही .... रडा!

भाऊला सबंध छापणं अशक्य आहे मचे एक मित्रवर्य अरुण नलावडे मराठी चित्रपट निर्मितीत उतरले आणि पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय विजेते ठरले होते. श्वास बध्दल काय लिहावं? जिथे आणि जेवढा असायला हवा तिथे नेमका आणि तेवढाच भिडणारा श्वास टाक्षाने मेलोड्रामा टाळणारा श्वास.  मोशन्सचं धुणं धोबीघाटावर नेऊन पिळ पिळ न पिळणारा श्वास. गाण्यांचे मार्केट बाजूला ठेवणारा अव्यवहारी श्वास. प्रत्येक प्रसंग जरा ही न लांबवता कट्स साधणारा श्वास. साध्याशा कथेतून जीवनावर मोठे भाष्य साधणारा श्वास. रंच श्वास मराठी चित्रपटांसाठी श्वासच ठरला आहे. या पार्श्वभूमीवर नानाचे वाक्य पचणे भाऊला जड जात होते.
 तू सांग ना! मराठी लेखक म्हणवतोस ना स्वत:ला?
पारधी, भिल्ल, भटके आणि विमुक्त, या  कॅटॅगरीत भाऊने मला यूं टाकले.
मराठी चित्रपटांबध्दल तुझे काय मत आहे?

     मराठी चित्रपटांनी  आणि संतांनी, एकेकाळी स्वत:च्या पायावर धोंडा मारुन घोतला होता असे माझे ठाम मत आहे. दोघांनी ही नको त्यांना, नाही ते समजावण्याचा प्रयत्न केला होता. पण हे भाऊला सांगून उपयोग नव्हता.
  
सध्या आपल्याला बरें दिवस आलेत. मी डिफेन्सिव!
तसं नको! मला सांग तुझा आवडता लेखक कोण?.. आता बघा सांगेल शेक्सपिअर नाहीतर हॅम्लेट!
भाऊने सर्वांवर विजयी नजर फिरवत एकमेव ज्ञात विदेशी साहित्यिकाला त्याच्या अपत्यासह मध्ये घोतला.
तसे बरेंच आहेत.. हॅम्लेट लेखक का नव्हता ? पुढे भाऊ नामक प्राणी आपल्यावर घसरेल म्हणूनच!
सगळे  परदेशी! मराठी एकतरी आहे का?
होते. एक भाऊ पाध्ये म्हणून..
आता हा भाऊ कोण?
आपल्याला एक हमनाम प्रतिस्पर्धी आहे हे भाऊला ठाऊकच नव्हते
अरे, ते मराठीत फार शिवराळ लिहायचे!
कुणीतरी मूलभूत माहिती पुरवताच,
म्हणूनच याला आवडत असणार! …. काय वेळ आलीय पहा मराठीवर!
भाऊ पुन्हा उधळला

 भाऊ पाध्ये आवडतात हा अजून एक साहित्यिक गुन्हा! समकालिन मराठी साहित्यिकांत एकमेव वेगळा आणि म्हणूनच भावणारा लेखकं ज्याच्या  कथेतील अनुभव आपल्याला सरळ छेदतात आणि कथेचा, तिच्या तटस्थ अविर्भावासह प्रवाह पाहून वेडं व्हायला होतं असलं भन्नाट प्रकरण! आपल्या लक्षात त्यांच्या शिव्याच राहिल्या! आणि भाऊंचाही संतझाला! यांच्या शिव्या आणि त्यांच्या ओव्या! आणखी आपण काय लक्षात ठेवलंय?
आता बोल ना! मराठी साहित्यिक म्हणवतोस ना स्वत:ला!?
भाऊच्या तमाम शिव्या मी  हसत झेलतो, पण  ही  सहन होणं शक्य नव्हतं!
शिव्या देऊ नकोस! मुद्द्याचं बोल!
माय रिवेंज टुवर्डस कंटेम्पररी मराठी लिटरेचर!
..आणि पोरीला कुठे टाकलीयस? इंग्लिश मिडियमलाच ना! अरे, या चोर लोकांनीच तर मराठीची पार काशी करुन टाकलीय!

मग कुणाकुणा लेखकाची मुले फॉरिनला आहेत, त्यांना मराठी अजिबात येत कसे नाही याची फोडणी मिळाली. प्रत्येक मराठी लेखकांने मायमराठीच्या ओसरीवर आपापली पोरे-बाळे बळी चढवलीच पाहिजेत असा एक निष्कर्ष सभेत एकतर्फी पास झाला. बहुतेक मतदाते लेखक नसल्याने त्यांनी आपली मुले अमेरिकेत पाठवण्यास काही हरकत नाही हे एक उपकलम होतेपण मी एकटाच होतो!

अशानेच आपली भाषा बाटवली जातेय! संस्कृति  बरबाद होतेय-
णि धर्म बुडतोय! एकमेव  कट्टर हिंदूने संधी साधली.
अफगाणिस्तानात जाऊन रहा!  हिंदूंचा मूलतत्ववाद!
दादर येईपर्यंत हा संवाद वेगवेगळया मार्गाने मराठीची वाट लावणार्‍यांवर करवादत होता दादर आले आणि भाऊ उठून दाराकडे सरकला,
उतरनेका है क्या?

     मला माहीत आहे, स्थल कालाचा तक्ता बदलून असे प्रसंग जागोजागी घडतात. आमच्यावर तर नेमाने बेततात. मराठीत चुकून काही लिहिलं तर तो गुन्हा ठरलेला आहे. म्ही काय जपायला पाहत आहोत?

     मागे एका नाटकाला इंग्रजी नाव दिले, समर्पक होते आणि गर्भितार्थ साधत होते.  
मराठी नाटकाला इंग्रजी नाव कशाला? मराठीत काय चांगली नावं मिळत नाहीत? एक ज्येष्ठ साहित्यिक.
त्यानी त्या नाटकाला एक दोन मराठी नावं सुचवली. एकंदरच कठीण होतं!

मराठी  भाषा शुध्द लिहिली गेली पाहिजें !
म्हणजे कशी?
ती शुध्द बोलली गेली पाहिजे!
पुन्हा!? शी?
भाऊचा आणि मराठीच्या अस्तित्वाचा संबंध काय? भाऊने स्वत: सोडून इतरांना मराठीचे कातिल ठरवण्यामागचे सायको ऍनॅलिटिकल रीजनिंग काय? भाऊला सांस्कृतिक दादागिरी करण्याचा परवाना कुणी दिला? असे प्रश्न इथे विचारायचे नसतात. कारण आपली परंपरा उज्वल आहे, इतिहास सोनेरी आहे आणि साहित्य अत्युच्च दर्जाचे आहे!
  
     आज जिला मराठी  म्हणायचे ती काही शतकांपुर्वी ‘मराठी’ या नांवाने प्रचलित तरी  होती का? त्या आधी कुठे होती? वापरात होती? एकूणच मराठी भाषेत परभाषेतून आलेले शब्द किती? ती कधी शुध्द होती का? किंबहुना आज जशी आहे तशी अवघ्या पन्नास वर्षंपुर्वी होती का? आजही ती सार्‍या महाराष्ट्रात एकाच पध्दतीने बोलली जाते का? या सार्‍यांची उत्तरे ‘नाही अशी आहेतं जगातील कुठलीही भाषा मुळात बोली असल्याने कोणत्याही काळी शुध्द असूच शकत नाही. णि जी नाहीच आहे ती शुध्दता टिकवायचा कोण सोस!

     मला वाटते, जेव्हा आपण मराठी भाषा आणि तिच्या शुध्दी विषयी बोलतो तेव्हा आपल्याला कागदावर लिहिली जाणारी लिपी आणि प्रचलित व्याकरण अभिप्रेत असते, बोली नव्हे. णि जी शुध्दता जपण्याचा आग्रह होतो ती फारतर पाच पन्नास वर्षें प्रचलित असतें. पुन्हा बोलीनुसार व्याकरणालाही कालांतराने बदलावेच लागते. याचे दाखले कोणत्याही पन्नास वर्षे जुन्या पुस्तकात मिळतील. मग पन्नास वर्षांहून मागे जे व्याकरण  अस्तित्वात होते ते आज अशुध्द मानायचे का? किंवा पुढे पन्नास वर्षांनंतर जी पध्दत अस्तित्वात असेल, ती जास्त शुध्द असणार आहे का? (केवळ उपयुक्ततेचा निकष लावायचा म्हटले तर प्रत्यक्षात या लिपीच्याच शुध्दिकरणाची आज गरज आहे, जेणेकरुन ती आजच्या डिजिटल की-बोर्डवर सुटसुटीतपणे बसवता येईल) बेसिक की-बोर्ड इंग्रजी वर्णमालेवर बेतलेला असल्याने ही आजची गरज आहे, असो.

     आज आपण मराठीकडे कशा नजरेने पाहतो किंवा पाहता येईल, यावर विचार करुया. ज आपल्याला वाचनाचा कंटाळा आहे, किंवा वाचायला वेळ नाही. पुस्तकं कोण लिहितात किंवा ती कोण छापतात, यापेक्षा ती कोण वाचतात हा फार महत्वाचा मुद्दा आहे. मराठी पुस्तक जाते ते मुख्यत: ग्रंथालयात, लायब्ररीत. एक प्रत सरासरी हजारभर लोकं (वाचली तर) वाचतात. हा डिजास्टरस रेशो आहे आणि तो बदलणे शक्य नाही. यामागे दोन कारणं असावीत एकतर जेवढे फुकटात मिळेल तेवढेच साहित्य वगैरे वाचायची  आपली मानसिकता किंवा जे छापले जातेय त्याची किंमत पुस्तकावर  छापलेल्या किंमती एवढी नसण्याची खात्री. मग ठोस ग्राहक नसल्याने ग्रंथालयांच्या जीवावर तगणारी प्रकाशने. मग कमी प्रतिंचे एडिशन छापले जाणे, त्यामुळे पुस्तकाची किंमत वाजवीपेक्षा जास्त होणे आणि त्याच मुळे त्यांचे मुख्य ग्राहक ग्रंथालयेच असणे हे चक्र सुरु होते. पल्याकडे सर्वात जास्त कोणती पुस्तकं विकली जातात ? तर धार्मिक! हे सांस्कृतिक दारिद्रयाचे लक्षण आहे! त्या मागोमाग क्रम लागतो शैक्षणिक पुस्तकांचा. शिकून नोकर्‍या मिळवणे हा तर आमचा धर्म! शेवटी आम्ही! जे किती विकले जाईल याची शाश्वती नाही असे पुस्तक काढतांना प्रकाशक काय पाहतो? पुस्तकाच्या रचना आणि दृष्य रुपात  दर्जावार कुठलीही तडजोड करायची नाही. कागद, छपाई वगैरे उत्कृष्ट असली पाहिजे, कमिशन दणदणीत दिलेच पाहिजे, अ‍ॅडजेस्ट कुठे कराल? लेखकाच्या मान (अवमान) धनात!  मग दर्जाच्या मानधनाला दर्जाचे लेखक. चले-चलो भई चले चलो! लेखक कशाला लिहिल?खाजहा सन्माननीयअपवाद!

     मी  का वाचायचे? जागतिक दर्जाचे साहित्य मराठीत भाषांतरीत होऊन आले तर मी वाचायचें, ओके. पण राजकीय, क्रीडा (अर्थी क्रिकेट) आणि नाट्य-चित्रपट सृष्टीतील लोकांनी थापेबाज चरित्रे लिहिली तर मी का वाचायची? खांडेकर-फडक्यांच्या फॉरमॅटमध्ये कादंबर्‍या भरघोस येतात. लग्न हे ज्यांचे एकमेव साध्य असते, त्या मी का वाचायच्या? वरकस जमिनीत तण माजावं, तशी कविता माजलीय! ती मी का वाचायची? ज्यांच्या उपजिविकेचे मुख्य साधन नोकरी आणि रविवार आरामखुर्चीत जातो त्यांच्या अनुभव विश्वाचं व्हॉल्युम काय? त्यातून किती कसदार साहित्य निर्मिती होऊ शकते?आणि झाली तर ती वाचणार कोण?

     हे सारं बदलता येईल का? आणि कसें? आज आपले मराठी तंत्रज्ञ जगभर अनेक सॉफ्टवेअर्स बनवत असले तरीही मराठी ऑपरेटिंग सिस्टम अजूनही अस्तित्वात नाही कारण ग्राहकच फुकट्या आहे - क्रांतिचे वारें माय मराठीला अद्याप लागलेले नाही -बुक्स, ई-न्युज किंवा ई-मॅगझीन्स  आम्ही कधी प्रचारात किंवा प्रसारात आणणार? जर निर्मिती खर्च कमी झाला तर नक्की कसला दर्जा  सुधारणार? आज मराठीच्या रचनेसाठी साधी एक स्टॅन्डर्ड की बोर्ड प्रणाली अस्तित्वात नाही ऑटो स्पेलचेक सारख्या सुविधा पॅकेज ओरिएण्टेड आहेत. मराठीत ऑनलाइन केलेली  कामें  ट्रान्सपोर्टेबल नाहीत. बाजारात उपलब्ध फॉन्टसही पन्नास साठ प्रकारचे आहेत, त्यांची एकमेकांशी सुसूत्रता नाही आणि बरेचसे परिपूर्ण ही  नाहीत. एकाच भाषेसाठी सॉफ्टवेअर बनवणार्‍या कंपन्या एकमेकांना पाण्यात पाहतात. सुसूत्रता येणार कशी?

पण परिस्थिति कितीही प्रतिकुल असली तरीही कुणीतरी पुढे जाणे गरजेचे आहे. वाचकांनी, ज्यांच्या घरात आज संगणक आलेलाच आहे, त्यावर वाचनाची सवय करुन घ्यायला काय हरकत आहे? आपले लेख संपादकांपर्यंत आणि अंक वाचकांपर्यंत सॉफ्ट कॉपीमध्ये जायला काय हरकत आहे? दहा ग्रंथालये भरतील एवढी पुस्तके एका छोटया डिस्कवर राहणे शक्य आहें असे संग्रह घरोघरी होतील का? संदर्भ म्हणून अख्खे ग्रंथालयच आपल्या दारी हजर असेल का? मराठी साहित्याचा ओघ परभाषेत रुपांतरीत होऊन देशी विदेशी जाईल का? मराठी लेखक  फेरारीमधून फेर्‍या मारेल का? स्वप्नांचं बरं असतं, इमले बांधायला पायाची गरज नसते! पण जोवर स्वप्न फुकटात पाहता येताहेत तोवर मी  ती पहाणारंच! किती झालं तरी मी मराठी आहे! सर्वच क्षेत्रात होत असलेल्या संगणकीय महाबदलांचे मी हारातूर्‍यां शिवाय स्वागत करणार! या दृष्टीने  आम्ही मराठीने  डिजिटलप्रकाशन सुरु करुन पुढे पाऊल टाकलेले आहें त्या निमित्ताने आम्ही मराठीलाहार्दिक शुभेच्छा
                                 
                                  - आभास आनंद
                                   आम्ही मराठी - दिवाळी २००४